मुंबई : ‘पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, १३ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे,’ अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली आहे.
या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत.
या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती भिलार ग्रामपंचायत व पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
(भिलार या गावाबद्दल अधिक माहिती देणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी https://goo.gl/HsT5n7 या लिंकवर क्लिक करा.)